रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
कौरवांचा पक्ष असलेल्या भाजपाने 11 वर्षात काय केले हे सांगावे-- हनुमंत पवार By Admin 2025-11-23

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




काँग्रेसने देश उभा केला, भाजपने जातीयता वाढवली

संगमनेर (प्रतिनिधी) -- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळा ,महाविद्यालय, रस्ते, धरणे, दवाखाने या सर्व सुविधांसह सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसने केले. याउलट विविध जाती जातींमध्ये भांडणे लावून राजकारण करणाऱ्या कौरव रुपी भाजपाने अकरा वर्षांमध्ये एकही काम  केले नसल्याची टीका काँग्रेसचे हनुमंत पवार यांनी केली असून युवकांनी भाजपाच्या खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर द्या असे आवाहन केले.

द्रोणागिरी हॉलमध्ये युवक काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, लेखक रोहित तावरे आदी उपस्थित होते.

Special Offer Ad