दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मागील एक वर्षात संगमनेरची शांतता सुव्यवस्था बिघडली --माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)--सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका आपण राज्यात अग्रगण्य बनवला. सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, याचबरोबर बंधू भावाचे वातावरण हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य होते. मात्र मागील एक वर्षापासून शहरांमध्ये दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असून संगमनेर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडली असल्याची चिंता काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी समवेत के.के थोरात ,शांताराम कढणे, विवेक कासार, सादिक तांबोळी सौरभ कासार सौ शोभाताई पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.