रमेशराव देशमुख यांचे निधन     |      घारगाव शिवारात आढळलेल्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटली आई वडील सह वाहन चालकालाही अटक     |      पुणे- नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे आमदार अमोल खताळखताळ यांनी विधान भवनात हातात फलक घेऊन वेदले सरकारचे लक्ष     |      पुणे- नाशिक महामार्गावर पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न बाप-लेखावर गुन्हा दाखल अवैध धंद्यावर कारवाईची मागणी     |      नासिक- पुणे रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे संगमनेर करांमध्ये प्रचंड संतापाची लाट जन आंदोलन करण्याची तयारी     |      संगमनेर रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन पेटणार...     |      विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |     
नासिक- पुणे रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे संगमनेर करांमध्ये प्रचंड संतापाची लाट जन आंदोलन करण्याची तयारी By Admin 2025-12-08

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नासिक- पुणे रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे संगमनेर करांमध्ये प्रचंड संतापाची लाट जन आंदोलन करण्याची तयारी

संगमनेर, प्रतिनिधी –

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे वळवल्यामुळे संगमनेर तालुक्यासह सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागांमध्ये आता प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी जमिनी आरक्षित करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला होता, तो मार्ग अचानक बदलल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने हा मार्ग बदलण्याचा घाट घातल्याबद्दल रेल्वे जनआंदोलन समितीने महायुतीमधील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले असून, आता राजकारण न करता या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नागरिकांना केले आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना एकत्र करून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तात्काळ पाठिंबा दिला असून, संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन याचिका दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. संगमनेर हे केवळ बाजारपेठेचे ठिकाण नाही, तर शैक्षणिक आणि मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. व्यापाराच्या आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिक-पुणे रेल्वे या शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याने मोठा विकास साधला आहे. तालुक्यात काकडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, उत्तरेकडून समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-हैदराबाद महामार्ग, निळवंडे धरण कालवे, हायटेक इमारती आणि नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण यांसारखे मोठे प्रकल्प झाले आहेत. या सर्व विकास साखळीमध्ये नाशिक-पुणे रेल्वेचा संगमनेर मार्ग अंतिम दुवा ठरणार आहे.आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही रेल्वे संगमनेरमधूनच

गेली पाहिजे. यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मोठ जनआंदोलन उभ करणे गरजेचे आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने प्रचंड नाराजी असूनही महायुती सरकारमधील मुख्यमंत्री,

पालकमंत्री आणि विद्यमान लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विधानसभेत प्रश्न मांडू असे गोल-मोल उत्तर देऊन उपयोग नाही. ही

रेल्वे शिर्डीमार्गे कोणामुळे वळली, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे राजकीय पत्रकबाजी न करता या निर्णायक आंदोलनामध्ये सर्वांनी प्रत्यक्ष सहभागी

व्हावे, असे आवाहन रेल्वे जनआंदोलन संयोजन समितीने केले आहे.नान्नज येथील आयटी इंजिनीयर आशिष रामकर आणि श्रुती संजय रहाणे यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना थेट आव्हान दिले आहे. हा रेल्वे मार्ग कोणामुळे बदलला हे सर्वांना माहिती आहे. अधिवेशनमध्ये प्रश्न मांडू असे न म्हणता, त्यांनी एकतर सत्ताधारी पालकमंत्री यांच्या विरोधात भूमिका घ्यावी किंवा आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

संगमनेरकरांच्या विकासासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची नव्हे, तर जनशक्तीच्या एकजुटीची गरज आहे, हेच या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.



Special Offer Ad