नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
अज्ञात इसमाने दोन चारचाकी वाहने पेटविली By Admin 2025-05-22

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




१० लाखांचे नुकसान ; घुलेवाडी येथील घटना

संगमनेर : अज्ञात इसमाने दोन

चारचाकी वाहनांना आग लावल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीमध्ये सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत हे व्यवसायाने चालक असून त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी दोन गाड्या घेतल्या होत्या. यामध्ये (एमएच ०८ आर ८८०४) ही टाटा विंगर गाडी त्यांनी राहुल बुरुडे यांच्याकडून एक महिन्यासाठी वापरासाठी घेतली होती. तर दुसरी (एमएच ०४ जीपी ३३३२) ही ट्रॅम्पो ट्रेव्हल्सची गाडी त्यांनी कोटक बँकेकडून घेतली होती.

सोमवारी (दि. १९) रात्री त्यांनी ही दोन्ही वाहने आपल्या घरासमोर लावून ते घरात झोपले होते. मात्र, मंगळवारी (दि.२०) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कुटूंबियांना अचानक जाग आली. तेव्हा दोन्ही गाड्यांना आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या आगीत २ लाख ९८ हजार रुपयांची टाटा बिगर व ६ लाख ९५ हजार रुपयांची ट्रॅम्पो ट्रॅव्हल्स, असे एकूण ९ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या गाड्या जळून खाक झाल्या आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात इसमाने हेतुपुरस्सर ही आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहे.