दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्यामुळे संगमनेर हे राज्यातील प्रगतशील व वैभवशाली शहर म्हणून ओळखले जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरावर होणारे बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी शहरातील स्वाभिमानी नागरिकांनी राजकीय विचार बाजूला ठेवून संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीसह सर्व समविचारी पक्ष असून या मार्फत जनतेचा जाहीरनामा प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
सुदर्शन निवासस्थानी आमदार सत्यजीत तांबे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरांमध्ये 1991 पासून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. सर्व नगराध्यक्षांनी आपापल्या कार्य काळामध्ये अत्यंत चांगले काम केले. निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमुळे 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी, 35 गार्डन, शैक्षणिक हब, वैभवशाली इमारती, विश्वासाची बाजारपेठ, शांतता सुरक्षितता सुव्यवस्था आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण यामुळे संगमनेर शहर हे राज्याला दिशादर्शक ठरले. सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने स्वच्छतेवर मोठे काम झाले असून मागील दहा वर्षांमध्ये राज्य व केंद्र सरकारकडून 27 कोटींची बक्षिसे मिळाले.