रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
नगर मनमाड रस्ता पहिला करा आणि मग संगमनेरला या..... By Admin 2025-11-29

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मागील एक वर्षापासून त्यांची प्रत्येक कामात टोल वसुली सुरू आहे

संगमनेर (प्रतिनिधी)

मागील तीस वर्षात संगमनेर नगरपालिकेला शिस्त लावली आदर्श नगरपालिका म्हणून काम केले .शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवले .सातत्याने विकासाचा योजना राबवल्या. शहर विकसित केले. मात्र आता काहीजण पूर्णवेळ टोल वसुलीच्या मागे लागली आहे. तर पहिला नगर मनमाड रस्ता पूर्ण करा आणि मग संगमनेरला या अशी टीका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर, नद्या मंजूर असे सांगत असून बनवाबनवी आणि निवडणुकीसाठी वेगवेगळे फंडे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याची उपरोधिक टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने नाशिक पुणे रोडवर मार्केट कमिटी समोर जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, डॉ. जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिलीताई तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसाक खान पठाण, अजय फटांगरे, सौ प्रमिला अभंग, यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.



यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर सेवा समितीच्या वतीने 11 जुने व नवीन वीस चेहऱ्यांना नगरपालिकेत संधी दिली आहे. मागील तीस वर्षात अत्यंत आदर्श पाणी नगरपालिका चालवली. उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण केले, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले. सातत्याने निधी मिळवला. 38 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण केली .शहरांमध्ये पाईपलाईनचे नवे जाळे निर्माण केले. टाक्या निर्माण केल्या. आणि त्यामुळे संगमनेर शहरात स्वच्छ पाणी मिळत आहे .यामागे कुणाचे तरी कष्ट आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. संगमनेर बस स्थानक सह विविध रस्ते पूर्ण केले. बायपास पूर्ण झाला त्यावर आता काँक्रिटीकरण सुरू आहे. शहरांमध्ये वैभवशाली इमारती निर्माण केल्या. 35 गार्डन उभारल्या. एका दिवसात झाले नाही तर त्यासाठी कष्ट केले आहे.

Special Offer Ad