दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर मध्ये दहशत व गुंडगिरी खपवून घेणार नाही
संगमनेर (प्रतिनिधी) - लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे एक परिवाराप्रमाणे आहे. येथे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात की परंपरा आपल्याला जपायची आहे. तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून गुंडगिरी व दडपशाही करणारी प्रवृत्ती संगमनेर मध्ये खपवून घेणार नाही. असा इशारा देत संगमनेर शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
चैतन्य नगर, मालदाड रोड, मेन रोड, घोडेकर मळा येथे झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उत्कर्षाताई रुपवते, उमेदवार शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, प्रसाद पवार, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पांचारिया ,किशोर टोकसे, गजेंद्र अभंग ,गणेश गुंजाळ, श्रीमती विजया गुंजाळ, डॉ.दानिश यांच्यासह विविध उमेदवार उपस्थित होते.