शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. By Admin 2025-04-10

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची  *अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा प्र से)* यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. शेतीचे नुकसान झालेल्या टोमॅटो शेतकरी गणेश वलवे व ऊस उत्पादक शेतकरी भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांच्याशी चर्चा केली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा सूचना मा. जिल्हाधिकारी यांनी केल्या. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या.  99% पंचनामे पूर्ण झाले असून त्या याद्या गावातील ग्रामपंचायत व व्हॉट्स ॲप ग्रुप वर प्रसिद्ध केलेल्या असून कोणाच्या काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याची विनंती केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकून राहिले आहेत त्यांनी ग्रामपंचायत मध्ये नावे दिली आहेत त्यांची उद्या तातडीने पंचनामे पूर्ण केली जातील अशी माहिती उपविभागीय अधिकारी  शैलेंद्र हिंगे यांनी दिली. प्रसंगी तहसिलदार धीरज मांजरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राहणे, सर्कल ससे मॅडम, तलाठी योगिता वाळुंज, कृषी सहाय्यक मोरे मॅडम, शेलार, गणेश वलवे, भाऊसाहेब भालके, सदू शिरतार,अशोक वलवे, विश्वनाथ वलवे, विकास वलवे, प्रशांत फटांगरे, भाऊसाहेब घोडे,संतोष डोंगरे आदी शेतकरी उपस्थित होते.

* *पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठी दिरंगाई होते व ती शासनाची मदत नुकसानीपेक्षा खूप तुटपुंजी असते त्यामूळे नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तरी भरीव व तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे शेतकऱ्यांच्या वतीने केली.*

        ....... साहेबराव वलवे

 (नुकसान ग्रस्थ शेतकरी तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा संगमनेर )





Special Offer Ad