रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
संगमनेर साठी महत्त्वाची नाशिक पुणे रेल्वे बाहेरून कशी चालली ते सांगा By Admin 2025-11-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मागील एक वर्षात शहरात नको ते घडते आहे

संगमनेर ( प्रतिनिधी) -- संगमनेर शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईन द्वारे स्वच्छ पाणी मिळते आहे. शहरात विकासाच्या योजना राबविल्या आहेत. शांतता, सुव्यवस्था यामागे कुणाचे तरी कष्ट आहे . हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण शहर जपले. मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अस्वस्थता वाढली असून अमली पदार्थांची तस्करी व दहशत वाढली आहे. हे थोपवण्याची जबाबदारी जनतेची असून संगमनेर साठी महत्त्वाची असणारी नाशिक पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यात मधून जाती कसे हे पहिले सांगा असा सवाल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जनता नगर मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ किशोर पवार, बाळकृष्ण महाराज करपे, प्रा हिरालाल पगडाल ज्ञानेश्वर राक्षे, अमित सोनवणे, गिरीश गोरे, तुषार वनवे, वैष्णव मूर्तडक, सौ रुपाली मिलिंद आवटी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Special Offer Ad