दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मागील एक वर्षात शहरात नको ते घडते आहे
संगमनेर ( प्रतिनिधी) -- संगमनेर शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईन द्वारे स्वच्छ पाणी मिळते आहे. शहरात विकासाच्या योजना राबविल्या आहेत. शांतता, सुव्यवस्था यामागे कुणाचे तरी कष्ट आहे . हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण शहर जपले. मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अस्वस्थता वाढली असून अमली पदार्थांची तस्करी व दहशत वाढली आहे. हे थोपवण्याची जबाबदारी जनतेची असून संगमनेर साठी महत्त्वाची असणारी नाशिक पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यात मधून जाती कसे हे पहिले सांगा असा सवाल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
जनता नगर मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ किशोर पवार, बाळकृष्ण महाराज करपे, प्रा हिरालाल पगडाल ज्ञानेश्वर राक्षे, अमित सोनवणे, गिरीश गोरे, तुषार वनवे, वैष्णव मूर्तडक, सौ रुपाली मिलिंद आवटी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.