दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
नाशिक- पुणे रेल्वेच्या संगमनेर मार्गासाठी राजकारण न करता सहभागी व्हावे
संगमनेर (प्रतिनिधी) -- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महा रेल्वे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून त्यांना पैसेही दिले मात्र सरकार बदलले आणि आता शिर्डी वरून रेल्वे मार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्ग बदलण्या पाठीमागे महायुती मधील सत्ताधारी जबाबदारी असून आता राजकारण न करता संगमनेरकरांच्या या आंदोलनामध्ये सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन रेल्वे जनआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे जाणार असल्याचे सांगितल्यानंतर संगमनेर तालुक्यासह सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड मंचर या सर्व तालुक्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने संगमनेर करांना एकत्र करून मोठे जण आंदोलन उभारण्याचा निर्धार केला. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने पाठिंबा दिला .आणि संगमनेर तालुक्यामध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली. याचबरोबर डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन पिटीशन सुद्धा दाखल करण्यात येत आहे.