दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरातील गोवंश हत्याकांडाच्या वाढत्या घटनांनी स्थानिक पोलीस, अहिल्यानगर एलसीबी, नगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे.
या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू असल्याने संगमनेरचे लोकप्रतिनिधी आता पूर्णपणे गप्प आहेत.या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू असल्याने संगमनेरचे लोकप्रतिनिधी आता पूर्णपणे गप्प आहेत. त्यांच्याकडून याप्रश्नी संगमनेरकरांना मोठ्या अपेक्षा आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये जाऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे मुस्लिम नेतेही आता अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या थांबवण्यासाठी भाजप व बजरंग दलाचा अजेंडा राबवणार आहेत की केवळ 'बोलघेवडेपणा' करणार, असा प्रश्न नागरिक समाज माध्यमातून उपस्थित करत आहेत. ही दुहेरी भूमिका जनसामान्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करत आहे.पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि आरोपींना अभय?... संगमनेर परिसरात गोवंश
हत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तलखाने असून, पोलिसांकडून अनेकदा कारवाई होऊनही हे प्रकार थांबताना दिसत नाहीत. आतापर्यंत या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या काही शेकड्याच्या पटीत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या कारवाया सातत्याने संशयाच्या घेऱ्यात आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार दाखवले जातात, तर वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होऊनही त्यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे गोवंश हत्या करणारे सर्रासपणे आपला व्यवसाय करत असून, त्यांना कायद्याची कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे.यापूर्वी गोवंश हत्याकांडाचे प्रकार उघडकीस येत तेव्हा हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असत, तीव्र निदर्शने करत असत. तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या 'हप्तेखोरी' विरोधात जाहीरपणे प्रशासकीय भवनासमोर मोठे जन आंदोलन देखील छेडण्यात आले होते. या आंदोलनातून अनेक गोष्टी उघड झाल्यानंतरही पुढे काय झाले, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करणारे काही मुस्लिम नेतेही आता सत्तेत सहभागी असूनही या विषयावर मौन बाळगून आहेत. यामुळे त्यांची राजकीय भूमिका केवळ फायद्यासाठी होती का, असा सवाल समाज माध्यमातून उपस्थित होत आहे.
ठोस कृतीची गरजः समाजात तेढ वाढण्याचा धोका!... गोवंश हत्या थांबवण्यासाठी केवळ
आरोप-प्रत्यारोप किंवा राजकीय भूमिका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम नेते दोघांनीही या गंभीर विषयावर एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. संबंधित पोलीस आणि पालिका प्रशासनावर हे कत्तलखाने आणि गोवंश कत्तली मुळासकट नेस्तनाबूत करण्यासाठी दबाव वाढवणे आवश्यक आहे. जर हे प्रकार असेच सुरू राहिले, तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, संगमनेरातील गोवंश हत्याकांडाच्या वाढत्या घटनांनी स्थानिक पोलीस, अहिल्यानगर एलसीबी, नगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता हे सर्वजण खऱ्या अर्थाने कृती करणार की केवळ 'बोलघेवडेपणा' सुरू ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येथील बेकायदेशीर कत्तलखाने आणि या कत्तलखान्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कोट्यावधीच्या उलाढालीप्रश्नी संगमनेरकरांना आता नुसते 'बोलबच्चन' नको, तर ठोस कृती हवी आहे!