संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका
By Admin 2025-03-28
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा
नागरिकांच्या जीवाला धोका
संगमनेर : संगमनेर शहर
व परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अर्ध्याहून अधिक रिक्षा बेकायदेशीर आहेत. अनेक रिक्षा मुदतबाह्य असून, त्यांची स्थिती खराब असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे; मात्र पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.