हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश     |      नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.     |      अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक     |      थोरात कारखाना निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी १३३ इच्छुकांच्या अर्ज दाखल विरोधकांकडून उमेदवार दाखल न करण्याच्या निर्णयामुळे निवडणुकीची वाटचाल बिनविरोधकडे     |      चॉपरने वार करून ३५ हजारांचा ऐवज लुटला; ४ जणांविरुद्ध गुन्हा     |      नवी मुंबईत हत्येचा थरार; ओला कार चालकाची हत्या, प्रेमी युगल संगमनेर पोलिसांच्या ताब्यात     |      जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप     |      संगमनेरात नामांकित डॉक्टर अमोल कर्पेवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल     |     
संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका By Admin 2025-03-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरात अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर रिक्षा नागरिकांच्या जीवाला धोका

संगमनेर : संगमनेर शहर
व परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अर्ध्याहून अधिक रिक्षा बेकायदेशीर आहेत. अनेक रिक्षा मुदतबाह्य असून, त्यांची स्थिती खराब असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे; मात्र पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
संगमनेर शहरात रोज शेकडो रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. शहरात ३०० हून अधिक रिक्षा विविध गल्ल्यांमधून प्रवासी सेवा देत आहेत. बस स्थानक परिसर, नवीन नगर रोड, अकोले रोड, चावडी, अशोक चौक, भारत चौक, गंवडीपुरा, नेहरू चौक, रंगारगल्ली, स्वातंत्र्य चौक, हॉटेल काश्मीर समोर अशा विविध ठिकाणी रिक्षा थांबे आहेत. येथे मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या असतात व त्याद्वारे हजारो नागरिक प्रवास करतात.
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यातील अनेक रिक्षा मुदतबाह्य असूनही खुलेआम रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक रिक्षा नादुरुस्त असूनही त्या गर्दीतून
प्रवाशांची वाहतूक करत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आरटीओ प्रशासन आणि पोलिसांनी शहरातील सर्व रिक्षांची तपासणी करून बेकायदेशीर रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शहरातील काही रिक्षा चालक पेट्रोल महाग असल्याने सीएनजी गॅस व लहान गॅस टाकीचा अवैध वापर करत आहेत. हा प्रकार पूर्णतः बेकायदेशीर असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या रिक्षांमधून प्रवास करत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करत असून, यामुळे अनेकदा वाद होतात. प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या काही रिक्षा पोलिसांनी पूर्वी जप्त केल्या होत्या. मात्र, नंतर लिलावाद्वारे या रिक्षा विकल्या गेल्या व त्या पुन्हा वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. नागरिकांनी अशा रिक्षा नष्ट करण्याची मागणी केली आहे.आरटीओ व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.